Maharashtra Water Resources Regulatory Authority

-+=

English

Maharastra Water Resources

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण
(महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ च्या कलम ३ अंतर्गत स्थापन)

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण
(महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ च्या कलम ३ अंतर्गत स्थापन)

जागरूकता मोहीम

कार्यक्रम क्रमांक : १

आज केसी लॉ कॉलेज, मुंबई यांच्या विद्यार्थी शिष्टमंडळाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

मा. डॉ. साधना महाशब्दे, सदस्य (विधी), मजनिप्रा यांनी ‘जल क्षेत्रातील कायद्यांमधील उदयोन्मुख सुधारणा आणि मजनिप्राची कार्यपध्दती’ या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित केले.

श्री. डॉ. रामनाथ सोनवणे (सचिव, मजनिप्रा) यांनी ‘प्राधिकरणाची कायदेशीर व्याप्ती’ याविषयी मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.

श्री. पी.आर. खिरे (सल्लागार, मजनिप्रा) यांनी अलीकडच्या काळात प्राधिकरणाने दिलेल्या महत्त्वाच्या निकालांविषयी माहिती दिली.

कार्यक्रम क्रमांक : २

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर आणि मुंबई अर्थशास्त्र सार्वजनिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्था व लाभधारक शेतकरी यांचेसाठी ” पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण ” या विषयावर दिनांक २४/०३/२०२३ रोजी तसेच वनामती नागपूर येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

     सदर कार्यशाळेत मजनिप्रा अध्यक्ष मा. डॉ. संजय चहांदे, मजनिप्रा सदस्य मा. श्री. संजय कुलकर्णी (जसवि) मा. डॉ.साधना महाशब्दे (विधी) मा. श्रीमती श्वेताली ठाकरे (अर्थ) यांनी उपस्थित शेतकरी व अधिकारी यांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेस पाणी वापर संस्था तसेच लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेती व पाणी वापर संस्थांशी संबंधीत खालील महत्वाच्या विषयांवर तज्ञांनी शेतक-यांचे प्रबोधन केले.

  • सिंचन व्यवस्थापनातील लोक सहभाग व NGO ची भूमिका,
  • शेतातील नाविन्यपूर्ण प्रयोग, पिक बदल उत्पादन खर्च व उत्पन्न
  • शेतकरी अनुभव कथन
  • पाणी वापर संस्थांचे लेखा परिक्षण व रेकॉर्ड ठेवणे

कार्यक्रम क्रमांक : ३

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे मा. अध्यक्ष – डॉ. संजय चहांदे, सदस्य (विधी) – डॉ. साधना महाशब्दे, सदस्य (अर्थ) – श्रीमती. श्वेताली ठाकरे तसेच संचालक – श्री. नरेंद्र तायडे आणि तज्ञ – श्री. खिरे यांचा वाघाड प्रकल्प जिल्हा- नाशिक या प्रकल्पाचा दि. २७ जून २०२३ चा दौरा तसेच वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्था कार्यालयात पाणीवापर संस्थाची आढावा बैठक.

कार्यक्रम क्रमांक : ४

पाणी वापर संस्थांनी लेखा परीक्षण केल्यास त्यांनाच स्थानिक पातळीवर परतावा मिळणार….डाॕ.संजय बेलसरे

 

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण,मुंबई गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ,संभाजीनगर व महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था,नाशिक यांचे वतीने महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रबोधिनी,नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील वापर पाणी वापर संस्थाकरिता नुकतीच एक दिवसाचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जलसंपदा विभागाचे सचिव डाॕ.संजय बेलसरे होते.मेरीचे महासंचालक मांदाडे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तिरमनवार,महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या लेखापाल श्रीमती श्वेताली ठाकरे,व मुख्य अभियंते देवगडे,मिसाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.अतिथींनी दीप प्रज्वलित करुन कार्यशाळेचे उद्घाटन केले.
पाणी वापर संस्थांचे पदाधिकाऱ्यांकरीता पाण्याचे मोजमाप कसे करावे व का करावे या विषयी थोडक्यात प्रास्तविक करतांना अधीक्षक अभियंता व प्रशासक महेंद्र आमले यांनी पाण्याचे मोजमाप करणे ही आता काळाची गरज असल्याचे सांगितल्या नंतर शेतकरी प्रतिनीधी दवंगे व काळे यांचे मनोगत झाले. पृथ्वी तलावावर एकूण उपलब्ध पाण्यापैकी ९७% पाणी हे समुद्रात असते व ते क्षारयुक्त असते.फक्त ३% पाणी हे गोड्या स्वरुपात असते.या तीन टक्क्यापैकी ६९% पाणी हे हिमशिखरामध्ये गोठलेल्या स्वरुपात असते.३०% पाणी हे भूगर्भात असते व उर्वरीत १% पाणी भूपृष्टावर उपलब्ध असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.त्या पुढे म्हणाल्या कि,जगात पाण्याबद्दलच्या धोरणात सहभागी सिंचनाला महत्व देण्यात आलेले आहे.पाण्याचा वापर काटकसरीने करुन मर्यादित उपलब्ध पाण्याचे आर्थिक मुल्य ( एकोनाॕमिकल व्हॕल्यू ) वाढविले पाहिजे.महिलांना आपल्या संसारात काटकसर करण्याची संवय असल्याने त्यांनी आता पाणी वापर संस्थामध्ये सक्रिय होऊन आपले गांवाचे शाश्वत विकासाला चालना द्यावी.शेवटी जगाच्या लोकसंख्येपैकी १८% लोकसंख्या (१४३ कोटी ) भारतात असल्याने प्रत्येकाने जीवमात्रास व पर्यावरणास लागणारे पाणी उपलब्ध करुन देणेसाठीही प्रयत्नशिल राहण्याचे आवाहन त्यांनी केले.महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून अधिनियमातील कलम क्र.५९अन्वये पाणी वापर संस्थांनी त्यांचे दरवर्षी लेखा परिक्षण करणे अनिवार्य असल्याचे सांगून तिरमनवार पुढे म्हणाले कि,महाराष्ट्रात पाणी वापर संस्थेची चळवळ सन १९८९-९० मध्ये सुरु झाली.पाणी वापर संस्थांनी सिंचन व्यवस्थापन केल्याने पाण्याचे कार्यक्षमतेत वाढ झाल्याने पाणी वापर संस्थांचे हितार्थ शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.आता पाणी वापर संस्थांचे माध्यमातून आपण जुनी फड पध्दतच एक प्रकारे पुर्नजीवित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी उपलब्ध असणारे पाणी विचारात घेऊन पिक रचना करण्याचे आवाहन करुन मांदाडे पुढे म्हणाले कि,ठिबक सिंचनाचा वापर करुन कमी पाण्यात येणारी मुल्य वर्धित पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत.पाणी वापर संस्थासाठी शेतकऱ्यांनी निधी जमवून आता शासनावर अवलंबून राहू नये.पाणी वापर संस्था सक्षम होणेसाठी प्रथम सिंचन व्यवस्थापनेचे तंत्र अवगत करुन इतर पूरक उद्योगासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले.१५ आॕक्टोबरच्या धरणातील पाण्याचे नियोजन करुन सिंचनासाठी किती व कसे पाणी उपलब्ध होते,याचे अनुमान काढावे व त्याच बरोबर आपले परिसरातील भूजलाचे पाणी विचारात घेऊन पिकाचे नियोजन करण्याचा सल्ला डाॕ.बेलसरे यांनी या प्रसंगी दिला.पुढे ते म्हणाले कि, पाणी वापर संस्थांनी सुरुवातीसच पाणी मोजून घेण्याची शिस्त अंगी बानवावी.त्यामुळे सिंचन व्यवस्थापन उत्कृष्ट होऊन कार्यक्षमतेतही सुधारणा होते.उपसा पाणी वापरकर्त्यांनी पाणी मोजण्याचे मीटर बसविले नसल्याने त्यांना पाण्याची आकारणी जास्त येत असल्याचे निदर्शनास आल्याने उपसा पाणी वापरकर्त्यांनी त्वरीत पाण्याचे मीटर बसविण्याचे आवाहन त्यांनी केले.या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व माहित आहे.त्यामुळे ते निश्चितपणे शासनास सहकार्य करुन पाणी मोजून घेण्याची व्यवस्था करुन सिंचन व्यवस्थापनेचे रोल माॕडेलची निर्मिती करतील,असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.वसुल झालेल्या पाणीपट्टीतून पाणी वापर संस्थेच्या खर्चाचा ताळमेळ बसण्यासाठी संस्थेने सर्वच बाबतीत लक्ष ठेवून व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.तसे जर होत नसेल तर संस्थांनी कायद्यातील तरतूदीनुसार इतर पूरक उद्योग करुन आपली आर्थिक गरज भागवावी.ज्या पाणी वापर संस्था कार्यक्षमपणे व्यवस्थापन करुन आपले कार्यकक्षेत मुल्यवर्धित पिके घेतात,तेथील संस्थांनी फाॕर्मर प्रोड्युसर कंपनी कार्यान्वित करण्याचा विचार करावा.पाणी आणि पैसा दोन्ही महत्वाचे घटकाचे ध्येय संस्थांनी डोळ्यासमोर ठेवून फाॕर्मर प्रोड्युसर कंपनी जाणीवपूर्वक चालवावी.पाणी वापर संस्थेतील व्यवस्थापनेत महिलांचा सहभाग सक्रिय करण्यावर भर देण्याचे सांगून पुढे ते म्हणाले कि,शासन आता यापुढे ज्या पाणी वापर संस्स्था आपले लेखापरीक्षण करुन घेतील त्या संस्थांनाच परतावा स्थानिक पातळीवर परत करण्याची व्यवस्था करीत असल्याचे सांगितले.


उत्तर महाराष्ट्रातील बराच भाग हा दुष्काळाचे सांवटाखाली असल्याने दोनशे पेक्षा जास्त शेतकरी प्रतिनिधी व अभियंते कार्यशाळेस उपस्थित होते.अधीक्षक अभियंता आमले व शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पालखेड विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत व प्रबोधिनीचे कार्यकारी अभियंता पाबळे व उप अभियंता प्रमोद कुलकर्णी यांचे टीमने कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाले नंतर सकाळचे सत्रात सहकार खात्याचे प्रमाणित लेखा परीक्षक अपसुंदे यांचे लेखा परीक्षणाचे महत्व, वाल्मीचे सहाय्यक प्राध्यापक भागवत यांचे पाण्याचे मोजमाप (भाग१ ) तर दुपारचे सत्रात ग्लोबल वाॕटर मॕनेजमेंट व ट्रेनिंग इन्स्टीट्युट,विल्होळी येथे लक्ष्मीकांत वाघवकर यांचे पाण्याचे मोजमाप ( भाग२ ) व्याख्यान झाले.ट्रेनिंग इन्स्टीट्युटचे कार्यकारी संचालक वाणी व त्यांचे सहकाऱ्यांनी पाण्याचे मोजमाप साधनांचे प्रात्यक्षिक करुन दाखाविले.सर्व उपस्थितांना जलसंपदा विभागातर्फे प्रमाणपत्र देण्यात येऊन कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

कार्यक्रम क्रमांक : ५

केसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 28/08/2023 रोजी प्राधिकरणाला भेट दिली

कार्यक्रम क्रमांक : ६

न्यू लॉ कॉलेज, भारती विद्यापीठ पुणे यांनी 29/08/2023 रोजी प्राधिकरणाला भेट दिली

कार्यक्रम क्रमांक : ८

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या तांत्रिक संहिता, २०१५ नुसार कार्यवाहीवर एक दिवसीय चर्चासत्र